मंगळवार, २६ मे, २०१५

कुमुद अवचट मित्तल पार्क ठाणे ( पश्चिम) - पुस्तक पेटी ने मला काय दिले -(निबंध स्पर्धा )

   खूप दिवस वाटत होते कि कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे जी पुस्तक पेटी योजना सुरु झाली आहे तिच्याशी आपला संपर्क व्हावा . तो दिवस आमच्या मित्तल पार्क या सोसायटीत सुरु झाला आणि आपली जी मनापासूनची इच्छा होतीय ती पूर्ण होते आहे म्हणून खूप खूप आनंद झाला.
    उद्घाटन झालं आणि पुस्तक पेटी योजना सुरु झाली. या प्रकल्पाचे प्रणेते विनायक रानडे यांनी हि योजना सुरु करण्याची इच्छा हेतू हे स्पष्ट केले . त्यामागची त्यांची वाचनाला प्रवृत्त करण्याची तळमळ समजली . स्वत आर्थिक झीज सोसून कोणाकडून कोणतीही वर्गणी न घेता केवळ वाचनाची सवय वाचकांना लागावी या उद्देशाने हे वाचनालय सुरु झाले. मित्तल पार्क व प्रकृती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचा प्रारंभ झाला.
विनायक रानडे यांनी अगदी सोप्पा आणि ओघवत्या भाषा शैलीत आपले मनोगत मांडले. हा सगळा वाचनाचा परिणाम. अंग झोकून देऊन केवळ वाचनासाठी प्रवृत्त करणे हि त्यांची सेवाभावी वृत्ती या तरुणांमध्ये निर्माण झाली हे पाहून आम्हा ज्येष्ठांचे मन भारावून गेले.
         महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज हे खरोखर आपले सर्वांचे आदर्श आहेत, त्यांच्या सामाजिक कविता आजही आपल्या अनेकांच्या मुखोद्गत आहेत. आकाशातील एका ताऱ्याला सुद्धा कुसुमाग्रजांचे नाव हा त्यांच्या साहित्याचा केवढा मोठा गौरव आहे.
        विनायक रानडे यांच्या या उपक्रमाला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. पेटीतील पुस्तके हि अगदी उत्तम बांधणीची आहेत. विविध लेखकांचे , विविध साहित्य प्रकार , विविध विषय अशी हि पेटी अतिशय वैविध्य पूर्ण अशी आहेत. मुख्य म्हणजे हि पुस्तके आम्हाला हाताळायला मिळाली. मैक्झिम  गोर्कि चे आई, सावरकरांचे सहा सोनेरी पाने , पु ल , मिरासदार , चि. विं ची  विनोदी पुस्तके , शरद दळविंचे एकलव्य, नर्मदा परीक्रमेचे अनुभव लिहिलेलं भारती ठाकूर यांचे आगळे वेगळे पुस्तक , अनिल अवचट यांचे समाजातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहून केलेलं समाजासमोर मांडण्याचे धाडस त्यांच्या कथा व्यथा हे सर्व आम्हास वाचावयास मिळाले . खूप खूप समाधान झाले . ज्या पुस्तकांच्या प्रतीक्षेत आम्ही कित्येक दिवस होतो. ती पुस्तके निवांत वाचनासाठी प्रवृत्त करणारी , अंतर्मुख करावयास लावणारी आहेत.
          खरोखर खूप आनंद आणि समाधान मिळाले . पुस्तकांची निवड खूप विचारपूर्वक झालेली आहे. या वाचानालायामुळे आम्हाला इतर वाचनालये बंद करावीशी वाटू लागले आहे.
          आम्हा ज्येष्ठ नागरिकांना तर हा अनुभव आनंदाचा होता. कारण आम्हाला वेळ भरपूर उपलब्ध आणि पुस्तकांच्या देवाण घेवानासाठी कोठे लांब जायला नको
           आमचा दृष्टीकोन व्यापक झाला. अनेकांची ओळख झाली. विचारांची देवाणघेवाण वाढली. पुस्तकांच्या अभिप्रायावरून तर ते पुस्तक केव्हा वाचू अशी उत्कंठा वाढली. सर्वात महत्वाचे म्हणजे पुस्तकातील बुकमार्क ते इतके बोलके आहेत कि वाचनालये म्हणजे देवालये समाजातील लोकांची मनेच त्यात उतरली आहेत (म्हणजे पाने फाडू नये वगैरे ) पुस्तकाला लहान बाळाची उपमा उत्तमच बाळाप्रमाणे उत्तम संगोपन , हे मनाला खूप भावले.
       डॉक्टर गोखले हि इतकी महान व्यक्ती हे योजनेमुळेच समजले बुकमार्क बद्दल किशोर पाठक यांना धन्यवाद
       पुस्तक पेटी योजनेला धन्यवाद. अश्याच नवीन योजनांचा अवलंब इतरांनी त्यांच्या पासून घ्यावा, प्रेरणा घ्यावी आणि अश्या प्रकल्पांचे उदंड पीक येवो त्या दीर्घ काळ टिकाव्या हि ईश्वर चरणी प्रार्थना.             
  
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा