मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी - यंग तरंग कार्यक्रम डी डी सह्याद्री वाहिनी सहभाग- श्री विनायक रानडे आणि श्री राजीव तांबे

ग्रंथ तुमच्या दारी - यंग तरंग कार्यक्रम डी डी  सह्याद्री वाहिनी-  सहभाग श्री विनायक रानडे आणि श्री राजीव तांबे .

१५ मार्च २०१५ आमच्या आयुष्यातील एक भन्नाट दिवस. भन्नाट या अर्थाने कि त्यादिवशी मी आणि मैत्रयी केळकर आम्ही  सहयाद्री वरील एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून गेलो. त्यादिवशी सकाळी आम्हाला विनायक रानडे यांचा फोन आला  कि आम्हाला दूरदर्शन वरील एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून यायचे आहे. आमची दोघींची धावपळ सुरु झाली . घरचे आवरून आम्ही दादर पर्येंत ट्रेन ने  आणि मग टेक्सी ने वरळीला गेलो. तिथे गेल्यावर  राजीव तांबे ( बाल कथा लेखक ) यांची हि ओळख झाली. आणि मग आम्ही सगळे मेक अप रूम मध्ये जाऊन बसलो. विनायक रानडे आणि राजीव तांबे  यांचा मेक अप होणार होता. तो होइ  पर्येंत आम्ही सगळे तिथे बसून त्या कार्यक्रमाबद्दल बोलत बसलो त्यात त्याच्या विनायक रानडे , राजीव तांबे , मधुवनी गाडगीळ , मैत्रयी केळकर. आणि समीरा गुजर  यांच्या गप्पा सुरु झाल्या . विषय होता वाचन आणि आजची पिढी . मुले वाचतात का ? काय वाचतात ? का नाही वाचत ? मराठी वाचतात का इंग्लिश ? मराठी लेखक आहेत का मुलांसाठी ? ते मुलांना माहित असतात का ? आणि मग आम्ही सगळे कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग ला गेलो कॅमेरा फिरत होता. मुले छान  संवाद साधत होती . 
       मुलांना जेव्हा विचारले ते का वाचतात ? तर वेग वेगळी उत्तरे आली. नवीनअनुभव घेण्यासाठी,स्फूर्ती येण्यासाठी, अभ्यासाला  पूरक  असे वाचन होते.
 मुले काय वाचतात हे विचारले तेव्हा कथा कादंबरी स्फुर्तीपर पुस्तके किवा आत्मकथा अशी उत्तर आली. यानंतर राजीव तांबे म्हणाले कि स्फूर्ती हि एकदा आली कि निघून नाही जात. ती आनंदासारखी असते कायम राहते.विनायक रानडे म्हणाले कि मुलांचे वाचन हे उपयुक्त गोष्टी वाचन करणे हेच होते. कारण पालक सांगतात पुढील भविष्यासाठी जे उपयोगी असेल तेच वाच. मुले हि तेच वाचायचा प्रयत्न करतात. वाचन करणे हे आनंद मिळवणे ज्ञान मिळवणे यासाठी करावे हे पालक विसरून गेलेत. 

      निवेदक समीर गुजर यांनी राजीव तांबे आणि विनायक रानडे यांना विचारले काय वाचले पाहिजे. राजीव तांबे म्हणाले कि जे चांगले ते वाचावे. आता चांगले काय हे प्रत्येकाने ठरवावे. पण वाचन हे आपला अनुभव समृद्ध करतात हे लक्षात ठेवून वाचावे . म्हणजे नक्की काय असे विचारल्यावर ते म्हणाले कि वाचन करताना वेगवेगळ्या भाषेतील वाचन करावे. भारतामध्ये तर कितीतरी भाषा आहेत त्यांच्या  कथा कादंबऱ्या वाचाव्या. त्याशिवाय जगात विविध देश आहेत त्यांच्या भाषेतील हि वाचन करावे. या वाचनाने आपले भाषा ज्ञान समृद्ध होते. असे सांगताना ते म्हणले कि आपली स्वताची भाषेची एक डिक्शनरी असते. या बद्दल सांगताना ते म्हणाले कि काही शब्द असे असतात कि त्याला समान अर्थ असतात जसे कि आग खून मारामारी दंगा हे शब्द ऐकले कि आपण लगेच सतर्क होतो जरी ते आपल्याला उद्देशून म्हणले नसले तरी त्याचा अर्थ आपण आपल्याशी जोडून लगेच काम करतो. 
      विनायक रानडे असे म्हणाले कि आपण सगळे विषय वाचले पाहिजेत जसे जेवणात सगळे रस असले कि जेवण खुलून येते तसे वाचनात सगळे विषय असले कि आयुष्य समृद्ध होते. समीरा  गुजर यांनी ग्रंथ तुमच्या दारी याबद्दल अधिक माहिती सांगावी अशी विनंती विनायक रानडे यांना केली.  ग्रंथ तुमच्या दारी हि एक वाचन संस्कृती वाढीस लावणारी योजना कुसुमाग्रज प्रतिष्टान तर्फे विनायक रानडे यांनी चालू केली. या योजनेत माझे ग्रंथालय हि एक योजना आहे यात डॉक्टर , इंजिनीअर या सारख्या सतत कामात मग्न असलेल्या पण वाचनाची आवड असलेल्या व्यक्तीसाठी २५ पुस्तकांची एक पेटी दिली जाते. आणि दर ३ महिन्यांनी हि पेटी दुसर्या व्यक्तीसोबत बदलली जाते. अशीच एक पेटी माझे ग्रंथालय बाल विभाग म्हणून हि निर्माण केली आहे त्यात इंग्लिश आणि मराठी पुस्तके मिळून २५ पुस्तके दिली जातात. हि पेटी हि २ महिन्यांनी बदलली जाते. त्याशिवाय मोठ्या व्यावसाईक संस्था , गृहनिर्माण संस्था , कारागृह, रिमांड होम या ठिकाणी ठेवण्यासाठी एक १०० पुस्तकाची पेटी दिली जाते हि पेटी दर ४ महिन्यांनी बदलली जाते . इतकी चं माहिती दिल्याबद्दल सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. 

       समीरा गुजर यांनी मुलांना विचारले कि शाळेचे ग्रंथालय कसे असावे. या विषयावर उत्तर देताना मुले म्हणाले कि त्या पुस्तकाची सूची असावी. पुस्तक मुलांना निवडण्याची मुभा असावी,सुट्टीत वाचता येण्यास्ठी सोय असावी , संदर्भ ग्रंथ वापरायची मुभा असावी. 
      त्यानंतर विनायक रानडे म्हणाले कि ग्रंथालय हे सुबक मांडणी असलेले असावे . ग्रंथपाल हा मदत करणारा असावा. त्याच बरोबर त्यांनी गुजरात राज्यातील एक योजना सांगितली त्यात एक महिना विश्वकोश सोबत अशी लहान मुलांसाठी योजना होती त्यात एका खोलीत विश्वकोश मांडून ठेवले असायचे आणि तिथे एक वही ठेवली होती मुलांनी रोज यायचे आणि हवे ते विश्वकोश वाचायचे जे असे २४ तास पूर्ण करतील त्यांना ४८ वह्या दिल्या जायच्या . 
     राजीव तांबे यांनी हि सांगितले कि त्यांनी शाळेत वाचन वाढण्या साठी एक योजना केली होती. जी मुले १०० पुस्तके वाचतील त्यांना पुरस्कार द्यायचा. पुस्तक भूषण, पुस्तक विभूषण असे पुरस्कार होते. जी मुले सांगायची कि पुस्तके वाचली त्यांना पुरस्कार देण्यात येई. पण मग मुलेच त्यांना विचारत  कि तू कोनती पुस्तके वाचलीस रे सांग बरे. मग  मुले खरे सांगत एवढी नाही वाचली कमी वाचली. पण वाचन वाढवण्याचा हा उपक्रम उपयोगी पडला           
         त्यानंतर एक भाषेच खेळ खेळला गेला . त्यात एक वाक्य दिले होते आणि ते पूर्ण करायचे होते सगळी मुले खूप आनंदाने खेळ खेळली आणि मग जेव्हा  ते वाक्य पूर्ण झाले तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. राजीव तांबे असे म्हणाले कि हा खेळ खेळताना  आपण २३ पेक्षा जास्त क्रियापदे शिकलो हे ऐकल्यावर मुले ही चकित झाली. राजीव तांबे म्हणतात कि आपण शिकतो म्हणजे काय तर ते जेव्हा समजून घेतो तेव्हा त्याचा उपयोग होतो. तेव्हा आपण ते व्यवस्थित व्यवहारात वापरू शकतो. हे सांगताना त्यांनी एक अनुभव सांगितला  ते युनिसेफ या संस्थे तर्फे शाळेची तपासणी करायला गेले होते तेव्हा त्यांनी मुलांना काही शब्द लिहायला सांगितले तर ते मुलांना लिहिता येत नव्हते तेव्हा त्यांनी शिक्षकांना विचारले तर ते म्हणले आम्ही फक्त काही शब्द लिहायला शिकवले पण ती अक्षरे  कशी लिहायची ते नाही शिकवले     

         त्यानंतर काही प्रश्न मुलांनी विचारले. वाचन म्हणजे फक्त प्रिंटेड पुस्तक च असावे कि इ पुस्तके वाचन व्हाटस अप ग्रुप वर जे टाकले जाते ते हि वाचन  नक्की काय चांगले ? याचे उत्तर देताना राजीव तांबे म्हणाले कि जे चांगले ते नक्की वाचावे मग ते माध्यम कुठले हि असेल तरी चालेल ते वर्ज्य नाही . पुढे ते असे म्हणतात कि नेहमी चांगले तेच टिकते. 
           विनायक रानडे असे म्हणाले कि प्रिंटेड पुस्तके जास्त परिणाम कारक असतात . पण ते म्हणाले कि   व्हाटस अप ग्रुप सारख्या माध्यमातुन नवी माहिती देता येते. जसे त्यांनी सांगितले कि ते रोज त्यांच्या ग्रुपवर आजचे विशेष टाकतात त्यात शास्त्रज्ञ, लेखक किवा विशेष व्यक्तीची माहिती देतात .   

            मुलांनी असे हि विचारले कि या इतर माध्यमांमुळे प्रिंटेड पुस्तकाचे वाचन कमी होईल का. यावर राजीव तांबे आणि विनायक रानडे म्हणाले नक्कीच नाही. प्रिंटेड पुस्तके वाचून जो आनंद मिळतो तो अबाधित असतो त्याशिवाय त्यातली माहिती चिरंतन असते . इतर माध्यमातील माहिती बदलत राहू शकते . 
            अश्याप्रकारे या यंग तरंग चा कार्यक्रम फार सुंदर रित्या संपन्न झाला .   


https://www.youtube.com/watch?v=sxmVQ8PT3tA


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा