गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

मी समन्वयक - मराठी भाषेच्या उत्कर्षाची चाहूल - श्री रामचंद्र पुरुषोत्तम मेहेंदळे

इवलेसे रोप लावलीयानावरी 
त्याचा वेलू गेला गगनावरी 
विनायकाच्या अंतरंगी स्वप्न होते आगळे 
स्वप्नपूर्तीचे समाधान असते जगावेगळे 

श्री विनायक रानडे , विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांनी मराठी भाषांचे संवर्धन व्हावे या एका ध्येयाने प्रेरित होऊन ग्रंथ तुमच्या दरी या बीज वृक्षाचा महावृक्ष कसा होईल याचा विचार तन मन धन लावून धरला आणि अखेर तो तडीस हि नेला. हा वटवृक्ष केवळ भारतापुरता मर्यादित न राहता परदेशस्थ मराठी नागरिकांपर्येंत पोहोचोवला यातच त्यांच्या यशाचे गमक आहे.
   सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांशी तुलना करता मराठी भाषेची किती शोचनीय अवस्था आहे हे सर्वजण  जाणतात  . महाराष्ट्राची मराठी भाषा हि जणू महाराष्ट्रामधून लुप्त होत चालली आहे असे आजचे एकंदरीत निराशाजनक चित्र आहे. मराठी भाषा जिवंत राहावी, तिचे संवर्धन व विकास व्हावा. लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व ती वृद्धिंगत व्हावी या एकमेव ध्येयाने श्री विनायक रानडे यांनी जी झेप घेतली आहे हि एक अभिनंदनीय व अविस्मरणीय अशी बाब आहे.
       या उपक्रमाला साहित्य क्षेत्रात , राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश जात आहे, उपक्रमाला प्रतिसाद मिळतो आहे. हेच या उपक्रमाचे फलित आणि यश आहे. मला पूर्ण विश्वास आहे कि आज ना उद्या   महाराष्ट्र सरकारला जाग येईल आणि मराठी भाषेला राजाश्रय प्राप्त होईल. या उपक्रमाद्वारे मराठी अस्मिता परत जागृत होऊन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल याबद्दल मनामध्ये तिळमात्र शंका नाही.
       मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी सर्व मराठी भाषिकांनी या उपक्रमाचे भव्य स्वागत करावयास हवे आणि जेथे जेथे शक्य आहे, जेथे जेथे मराठी माणूस आहे त्याच्या दारापर्येंत या उपक्रमाचे पाऊल पडावयास हवे . मराठी भाषेला भूतकाळात मिळालेले उज्वल यश भविष्यात परत प्राप्त करून देण्यास सर्व मराठी भाषिकांनी यथाशक्ती सहकार्य करावे हे आवाहन करतो

या उपक्रमासाठी माझ्या लाख लाख शुभेछा












        

आधार - श्री बबन सावंत

नसला आधार तुम्हाला कुणाचा जरी , देऊ शकता तुम्ही
तुमचा आधार कुणाला तरी
जसा जगाला प्रकाश देतो दिवा
स्वतःखाली अंधार असला तरी
आंधळ्याने लंगड्याला पाठीवर घेतल्यास दोघेही करू शकतात वाटचाल जीवनाची
तरुच्या आधारानेच वेळी उंची गाठतात तरुच्या बरोबरीची
तार फुलाला अन्नपाणी झाडच पुरवीत असते.
कलम केलेली फांदीसुद्धा झाडाच्या आधारानेच पोसली जाते.
कुणाचा आधारस्तंभ होण  तसं कठीण असतं
पण बुडत्याला काडीचा आधार देणे मात्र सोपं असतं
प्रत्येकाला आयुष्यात आधाराची देवाण घेवाण होतंच असते
अंतिम यात्रेत सुद्धा चार खांद्याच्या आधारानेच जावे लागते


जादूची पेटी -श्री दत्तात्रेय शंकर धुमाळ

या पेटीमध्ये दडलेय काय?
पेटीमध्ये दडलेय काय
खाऊ कि काय? नुसती बडबड
हि तर जादूच्या पेटीची खडखड  
पेटीला खोलता ग्रंथ, येती तुमच्या हाती
वाचून वाचून लिहिता टिप्पणी
लहान मोठे घेती गुंफणी
या पेटीमध्ये दडलय का
दडलय का
वाचकांची भूक वाचकांची भूक
संपता संपेना पेटीवर पेटी बदलती पुस्तके
म्हणतात कसे खाऊ कि काय? नुसती बडबड
हि तर वाचकांसाठी, जादूच्या पेटीची खडखड
आमची भूक तुमची पेटी
असू द्या आम्हा सदेव भेटी
ग्रथ तुमच्या दारीची
जादूच्या पेटीची
  

सरस्वतीचे मंदिर -सुप्रिया नाईक

सुशांत जागा
जसे तपोवन
जिथे साठले
विद्येचे धन
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या दारी
होऊन मोहित निर्भर
रसिक येउनि
विहार करिती
रंगीत पृष्ठे
मिटती उघडती
हे निवडू कि ते घेऊ
चिंतन करिती
येती जाती
सुखे विहरती
ज्ञानाचे कण
सरस्वतीचे हे तर दालन
इथे शांतीचा केवळ वावर
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या दारी
होऊनी मोहित निर्भर
कुण्या रसिक काव्य आवडे अध्यात्माचे कुणा वावडे
रुची वेगळी , दुर्लभ योजक
मेल घालती ग्रंथ पेटीचे
ते संग्राहक
अतीव सुंदर
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या द्वारी
होऊन मोहित निर्भर
रसिकांसाठी हे दुजे घर
अभिमानाची वाहून मोहर
एकजुटीने सहकार्याने
जपूया सारे नव्या जुन्याचा
सुवर्ण संकर
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या दारी
होऊनी मोहित निर्भर





बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

विधिलिखित - श्री बबन सावंत

कोणी म्हणती नशीब तयाला , कोणी म्हणती विधिलिखित
अस्तित्व तयाचे मानवी जीवनी आहे मात्र खचित
एकाच फांदीची दोन फुले , एक वाहिले जाते प्रभू चरणावर
तर दुसरे जाऊन पडते , माणसाच्या कलेवरावर
जुळे जरी जन्म घेती , एका मातेच्या पोटी
एक जीव त्यातील होती करोडपती, दुसऱ्याच्या हाती मात्र करवंटी
जन्म घेती प्राणी जगती, दीर्घायुष्य जगण्यासाठी
पण काही मरती अल्पायुषी , तर काही जगती शतायुषी
कसे जगावे, किती जगावे, नसते अपुल्या हाती
ते सारे लिहिले जाते, विधीच्या ताळेबंद खाती
विज्ञानाच्या प्रगतीतून , मानव चंद्रावर पोचला
पण कल्पनाचे विधिलिखित तो नाही टाळू शकला
अटल जरी असेल अपुले विधिलिखित
तरी धरू नये भीती तयाची मनात
फुले असतो वा काटे वाटेत
चालत राहावे जीवनात , सदेव आनंदात

माझी आई - श्री बबन सावंत

नऊ महिने नऊ दिवस वाढवलेस तू मला तुझ्या उदरात
म्हणूनच मी आलो आज या जगात
माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब बनलाय तुझ्याच दुधाने
तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेस तू मला प्रेमाने
सरस्वतीचा श्री गणेशा तुझे बोट धरून शिकलो मी
तुझ्याच छायेखाली लहानाचा मोठा झालो मी
मातृप्रेमाची महती गायली आहे अनेकानेक कवींनी
मी पामर वर्णू कशी ती शब्दांनी
ठेच लागली कधी जर मम पायाला
आई ग शब्द फुंकर घालतात मम वेदनेला
निसर्ग नियमानुसार सोडून गेलीस तू या जगाला
कायमचे पोरके करून तुझ्या या मुलाला
तुझ्या आठवणीने आजही पाणावतात डोळे माझे
नाही फेडू शकणार मी या जन्मी ऋण तुझे


निर्माल्य - श्री बबन सावंत

निसर्ग नियमानुसार ठरलो आहोत आपण ज्येष्ठ
पण मानाने आहोत आपण अजूनही धष्टपुष्ट
वय परत्वे चालताहेत रोग अनेक
पण त्यांची पर्वा नाही आम्हाला क्षणेक
पण जरी पिकलं असलं तरी हिरवा आहे देठ
ज्ञानाभूवाने आम्ही आहोत सदेंव श्रेष्ठ
दिसू लागले आता जरी पैलतीर
आम्हाला नाही त्याची जरा हि फिकीर
वसा घेतला आहे आम्ही समाज सेवेचा
म्हणून झेंडा उंचवतो आम्ही समाज सेवेचा
निर्माल्य झाले असेल जरी आज आमच्या आयुष्याचे
तरी उगवतील त्यातून अंकुर उद्या नव्या विचारांचे


रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सेलेब्रेटी कॉर्नेर -ज्योती कपिले - कवयत्री

कुसुमाग्रज प्रतिष्ठानने अतिशय निस्वार्थ पाने एक व्रत एक वसा म्हणून हाती घेतलेल्या एक अभूत पूर्व अश्या योजनेचा अर्थात ग्रंथ तुमच्या दरी या वाचन संस्कृती वाढवण्याच्या जोपासण्याच्या प्रयत्नांचा अथक प्रसार करणाऱ्या आणि  ह्या योजनारूपी शिवधनुष्याला पेलणाऱ्या प्रत्येक वाचन प्रेमींना माझ्या शुभेछा


सेलेब्रेटी कॉर्नेर -अनिता दाते केळकर

आपले जीवन समृद्ध करण्यात विकसित करण्यात साहित्याचा मोठा वाट आहे. विविध काळातील विविध विषयांची व साहित्य प्रकारांची पुस्तके ह्या पेट्यांत भरलेली आहेत. हि पुस्तके वाचकांसाठी आनंद देणारा बहुमुल्य खजिना आहे तो लुटावा आणि आपल्या जाणीव संपन्न कराव्यात

ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाला माझ्या शुभेछा   

सेलिब्रेटी कॉर्नेर - श्री शैलेश दातार

ग्रंथ तुमच्या दारी या  योजनेचा मी सदस्य आहे . वाचण्याची प्रचंड आवड , कुसुमाग्रजांकरिता मनात असलेले अत्यंत आदराचे स्थान आणि आसपास चांगल्या वाचनालयांची वानवा असल्याने साहजिकच या उपक्रमाचा भाग झालो आहे. हा उपक्रम तरुण आणि लहान मुलांपर्येंत पोहचून त्यांना याची आवड निर्माण करण्याचे आव्हान मात्र आपल्या समोर आहे. माझ्या वाचण्याचा ध्यास अविरत चालू ठेवण्याकरिता या उपक्रमाने मोलाची मदत केली त्याबद्दल धन्यवाद.

सेलिब्रेटी कॉर्नेर - श्री सुनील बर्वे

ग्रंथ तुमच्या दारी हा आजच्या काळातला अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. इंटरनेट  आणि दगदगीच्या जीवन पद्धतीमुळे कामावरून घरी आले कि बाहेर पडावेसे वाटत नाही. त्यामुळे घरात बसल्या बसल्या जी करमणूक जे प्रबोधन जे ज्ञानार्जन होईल त्यात लोक रमताना दिसतात . त्यामुळे लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तक आणून वाचणे तर फारच दुर्मिळ आहे. अश्यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे सुरु केलेला हा उपक्रम हि काळाची गरज आहे. अश्या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद हि उत्तम मिळतोय हे ऐकून खूप आनंद झाला व हा उपक्रम राबवणाऱ्या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे असे वाटले.


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

८ नोव्हेंबर २०१५ रोजी संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि ऋतुरंग परिवारातर्फे ८ नोव्हेंबर २०१५ रोजी संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा माझे ग्रंथालय बालविभाग आणि ऋतुरंग सदस्यांसाठी नाशिक येथे आयोजित केली आहे
स्थळ -ऋतुरंग भवन , दत्त मंदिर , नाशिक रोड विभाग
वेळ -सकाळी ११-१
समन्वयक तन्वी अमित -७६९८८२९९९

प्रकाश यात्रा आठवणीची कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्टान ६ नोव्हेंबर २०१५ वृत्तपत्र बातमी

या कार्यक्रमात १५० कलावंतांची आठवण म्हणून त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते एक पणती कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे प्रज्वलित करण्यात येणार आहे. या निमित्ताने  आठवणींची  देवाणघेवाण, गप्पा , फराळ   आणि प्रकाश यात्रा याचे आयोजन केले जाणार आहे .

https://youtu.be/8IZNwnEZ-vE 

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ३१ ऑक्टोबर २०१५ ग्रंथ तुमच्या दारी - ग्रंथ पेटी कार्यक्रम वृतांत आणि छायाचित्रे

     महाराष्ट्र सेवा संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी सुविधा गोखले सभागृह (महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड) येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ अलका भावे यांनी केले. 
    या कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री विनायक रानडे , महाराष्ट्र सेवा संघाचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , प्रमुख अतिथी म्हणून श्री विसुभाऊ बापट आणि सौ उमा बापट उपस्थित होते.या शिवाय मुलुंड मधील ६ प्राथमिक शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक आणि विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरवात  ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची थोडक्यात माहिती देऊन करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना  मान्यवरांच्या हस्ते १०० पुस्तकांची  (७० मराठी आणि ३० इंग्रजी )ग्रंथ पेटी  प्रदान करण्यात आली. श्री विनायक रानडे यांना संवाद साधण्याची विनंती केली.
    श्री विनायक रानडे यांनी मुलांशी संवाद साधताना विचारले कि ती वाचतात का? तर त्याचे उत्तर अगदी एकासुरात हो असे आले मग ते म्हणाले कि वाचन हे आपली उन्नती घडवते त्यातून नवीन विषयाचे ज्ञान मिळते. वाचन सहभागातून शिक्षण घेणे शिकवते. त्यांनी त्याच बरोबर महाराष्ट्र सेवा संघाचे या  योजनेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.आणि श्री विसुभाऊ बापट यांनी या कार्यक्रमात येणे मान्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
      सौ युगंधरा वळसंगकर यांनी श्री विसुभाऊ बापट यांची थोडक्यात ओळख करून दिली. त्यांची ओळख करून देताना त्या सांगतात कि २६ मे १९८१ रोजी त्यांनी कुटुंब रंगलेय काव्यात या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर सलग ३४ वर्ष हा कार्यक्रम ते करत आहेत. त्यांनी २००७ मध्ये सलग १५ तास कविता वाचन करून नवीन विक्रम केला जो लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंदवण्यात आला. १ एप्रिल २०१५ रोजी वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि १२ जुन २०१५ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया असे सन्मान त्यांना मिळाले . विसुभाऊ नि मराठी रसिकांना मराठी कविता ऐकायची आणि अनुभवायची अनुभूती दिली.हा प्रयोग २७४२ वा आहे असे त्यांनी नमूद केले.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात याचे प्रयोग सादर करण्यात आले. आश्रम शाळांसाठी मोफत प्रयोग सदर केले. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या होऊ नये या साठी त्यांना कवितेच्या माध्यमातून धीर देणारे कार्यक्रम त्यांनी केले. हे सांगून  त्यांनी श्री विसुभाऊ बापट यांना   ओमकार काव्यदर्शन कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. 
     श्री  विसुभाऊ यांच्या कार्यक्रमाआधी आभारप्रदर्शन चा कार्यक्रम करण्यात आला . यात सौ गीता ग्रामोपाध्ये  आणि सौ प्रतिमा जोशी यांचा सत्कार मान्यवरान्तर्फे करण्यात आला. सौ अलका भावे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , श्री विनायक रानडे , श्री विसुभाऊ बापट , सौ उमा बापट , कॅन्टीन व्यवस्थापक , सेतू प्रकाशन चे श्री किशोर साळवी , श्री विजय वैद्य ,सौ मैत्रीये केळकर आणि उपस्थित प्रेक्षक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले त्यानंतर श्री विसुभाऊ यांनी कार्यक्रम सुरु केला.     
     श्री विसुभाऊ बापट यांनी त्यांचा ओमकार काव्य दर्शन हा कार्यक्रम सदर केला . कार्यक्रमाची सुरवात सरस्वती वंदनेने केली. त्यानंतर गुरु प्रार्थना केली. त्यानंतर विविध प्रकारच्या बाल कविता सदर करून मुलांना उत्तम प्रकारे गुंतवून ठेवले. कविता म्हणजे काय तिचे प्रकार हे फार सुंदर रित्या त्यांनी विशद केले. कविता म्हणजे उत्कट सौंदर्याचा भावपूर्ण अविष्कार हे सांगताना त्यांनी कवितेचे वेग वेगळे १२ प्रकार सांगितले . कविता सदर करताना त्यांना आलेले अनुभव आणि वेगवेगळ्या सुंदर कविता यांचे अप्रतिम सादरीकरण  त्यांनी या कार्यक्रमातून घडवले. श्री विसुभाऊ बापट यांनी सौ उमा बापट यांच्याविषयी माहिती देताना सांगितले कि त्या हिंदी विषयात विशारद असून त्यांनी ४ पुस्तके हि लिहिली आहेत, त्याशिवाय त्या बालभारती मध्ये गाईड चे काम करतात , कविता वाचनात हि त्या विसुभाऊ न साथ देतात.  
   सौ उमा बापट यांनी वाचन  हे माणूस घडवते. नुसते वाचन न करता त्यावर चर्चा केली तर नवीन विषयाचे आकलन हि होते. त्यांच्या लहान पाणी त्यांच्या वडिलांमुळे त्यांना वाचनाची आवड कशी निर्माण झाली . आणि शिस्तबद्ध वाचन केल्यामुळे त्यांचा कसा विकास झाला त्याचे त्यांनी वर्णन केले.
   या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मांडून ठेवलेल्या ग्रंथ पेटीचे मुलांना खूपच आकर्षण वाटत होते. श्री विसुभाऊ यांच्या कार्यक्रमात मुलांनी खूप सुंदर सहभाग दर्शवला.
    या कार्यक्रमाच्या संयोजनेत सौ मैत्रीयी केळकर, सौ अलका भावे , सौ प्रतिमा जोशी , सौ किशोरी वाणी , सौ युगंधरा वळसंगकर , सौ गीता ग्रामोपाध्ये , श्री विनायक जोगळेकर ,श्री विजय वैद्य आणि कुमारी अदिती भावे यांनी सहकार्य केले. नाशिक हून खास नाशिक ग्रंथ तुमच्या दरी विभागाचे श्री अरुण नातू हि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.      
                     
 

https://www.youtube.com/watch?v=q7q7wJGU48Q&feature=youtu.be