गुरुवार, २० मार्च, २०१४

अंधेरी केंद्र – मुंबई ( पश्चिम ) - प्रथम वर्धापन दिन सोहळा १३ जानेवारी ,२०१४

अंधेरी केंद्र – प्रथम वर्धापन दिन  सोहळा
प्रमुख पाहुणे – श्री. विनायक रानडे
कें द्राचे नाव   – आरटीओ अंधेरी ( पश्चिम  )
कें द्र समन्वयक  - मेजर (निवृत्त) अरुण शिरीसकर,
. "     मकर संक्रांतीच्या  पूर्व  संध्येला,‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेच्या अंधेरी,मुंबई  केंद्राच्या
स्थापनेचा प्रथम प्रथम वर्धापन दिन  सोहळा १३ जानेवारी ,२०१४ रोजी सिंधूदुर्ग भवन  आर.टी.ओ.अंधेरी
येथे मोठ्या दिमाखात  साजरा झाला. अंधेरी केंद्राची आक्रमक वाटचाल ह्याबद्दल कें द्र चालक मेजर शिरीस्कर  यांनी उपस्थितन  माहिती दिली . वर्षभराच्या साहित्यिक प्रवासाचे अवलोकन  केले व अंधेरी कें द्रांच्या वाटचालीत सहकार्य  करणारयांचे आभार मानले.
        मुंबई पश्चिम  विभागाचे  मुख्य समन्वयक   डॉ. महेश अभ्यंकर यांनी वाचन  का  आणि कसे करावे  याबद्दल मोलाचे मार्गदर्शन  केले. तसेच वाचनाने जीवनात  कशी प्रगल्भता येते याचे  सुरेख विवेचन  केले.
        सुप्रसीध्द लेखका सौ. शांभवि जयराम हडीकर या खास वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांच्या“ तुझ्याशीच बोलत्येय मी '" ह्या पुस्तकातील काही हृदयस्पशी उतारयांचे वाचन झाले. तसेच कवि -   कें द्र चालक वाचक सर्व  श्री. बबन सावंत आणि  रघुनाथ मोहिते यांच्या सुयोग्य काव्य-वाचनाने कार्यक्रमाला रंगत आणली.
        कें द्र-संचालकांचे मनोगत,सूचना आणि  समस्या या विषयी  श्री. अशोक काणे यांनी माहिती दिली. या योजनेचे  प्रमुख शिल्पकार श्री. विनायक रानडे,त्यांच्या नागपूर - अमरावती  - पुणे या झंझावाती दौऱ्यावर  असूनसुध्दा, त्यांनी‘ग्रंथ तुमच्या दारी‘ या त्यांच्या अंधेरी येथील  प्रथम वर्धापन दिन  सोहळ्यास उपस्थित राहून योजनेच्या यशाबद्दल समस्त वाचक वर्गाचे अभिनंदन व मार्गदर्शन केले
वर्धापनदिन कार्यक्रमाचे उत्तम संचालन सौ. शुभा तायशेट्टे यांनी केले. . आभार प्रदशवन आणि  राष्ट्रगीत गायनानंतर अंधेरीकरांच्या कार्यक्रमाची सांगता झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा