गुरुवार, २० मार्च, २०१४

विजयनगर सहनिवास को.ऑ.सो.-निवासी संकुल मुंबई ( पश्चिम ) ग्रंथ पेटी उदघाटन ३० जून २०१३

ग्रंथ पेटी उद्घाटन

 प्रमुख पाहुणे         हिंदुजा रुग्णालयाचे  डॉ. प्रमोद लेले
 कें द्राचे नाव       -  विजयनगर सहनिवास  को.ऑ.सो.-निवासी संकुल
 कें द्र समन्वयक  -श्री. महेश आठल्ये

        “अंधेरी  पूर्व  येथील ‘विजयनगर सहनिवास’ को. ऑ. सो. च्या निवासी संकुलात  कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि गोरेगावकर नागरिक  या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारया“ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेच्या २५ व्या ग्रंथ पेटीचे लोकार्पण रविवार ,३० जून २०१३,सकाळी ११ वाजता . डॉ. प्रमोद लेले व प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री.विनायक रानडे याचे हस्ते करण्यात आले.या सोहळ्यास अनेक जेष्ठ नागरिक आणि महिला  मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.
          त्यावेळी मान्यवरांची  ओळख करून  देताना,सोसायटीचे सचिव  श्री. महेश आठल्ये आणि त्यांच्या सहकारयांनी,यापूर्वी  क्रीडाकक्ष आणि वातानुकुलीत व्यायामशाळेची सुविधा देताना,वाचनालयसुूरु  करण्याच्या आश्वासनाची आज पूर्ती  होत असल्याचे सांगितले .त्यांनी उपस्थितांच्या माहितीसाठी माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतीभा देविसिंगजी -पाटील यांनी यापूर्वी प्रतिष्ठानला  पाठविलेल्या शुभसंदेशाचे  वाचन केले.तसेच‘महाराष्ट्र टाइम्स’ या मराठी वृत्तपत्राने  या कायक्रमाला दिलेल्या प्रसिद्धी बद्दल त्यांचे आभार मानले.
       प्रास्ताविकात डॉ. महेश अभ्यंकर यांनी त्यांच्या ‘गोरेगावकर नागरिक ’ या संथेच्या कार्याची ओळख करून दिली.  आजच्या काळात अशा योजनांचे महत्व सांगून त्या राबविण्याची आवश्यकता  असल्याचे स्पष्ट  केले. हिंदुजा रुग्णालयाचे  डॉ. प्रमोद लेले यांनी, नाशिक  येथील रुग्णालयात ज्याप्रमाणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही योजना राबविण्यात येते त्याप्रमाणे मुंबईतील रुग्णालयातहि  ही योजना संयुक्त विद्यमाने कार्यान्वित व्हावी असा मानस व्यक्त केला.
        श्री. विनायक रानडे यांनी ही योजना लहान-मोठ्या देणगीदारांच्या आर्थिक सहभागातून अमलात येत असल्याने नुसती वाचन  संस्कृतीच वाढीस लागत नाही तर आजच्या काळात परस्पर संबंध दृढ होण्याचेअत्यावश्यक  असलेले कामही सहजपणे होत असल्याचे सांगितले .या योजनेस सर्वांचा  भक्कम पाठिंबा आणि आवश्यक  पाठबळ मिळाल्याने अल्पावधीतच  एकूण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर,५० शहरात ७० लाख रु . किमतीच्या,१४,००० वाचकांसाठी ३४० ग्रंथ द्वारा पेट्या वाचन केंद्रे सुूरु  असून सुरवातीलाच  ३ ग्रंथ पेट्यांची मागणी असणारे हे पहिलेच कें द्र होते. तीनही पेटयातील पुस्तकांची मंचावर  आकर्षक  मांडणी के ली होती.कधी एकदा पुस्तके वाचावयास  मिळणार याची सारयांना उत्कं ठा होती. प्रत्येक पेटीतील काही पुस्तके समनवयक व  वाचक   यांना देऊन ग्रंथ पेटीचे प्रतीकात्मक  उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले
        योगायोगाने त्याच दिवशी  संकुलातील ८४ वर्षांचे  जेष्ठ  श्री. ढवळे  यांचा जन्मदिवस
असल्याने त्यांच्यातर्फे कुसुमाग्रजांच्या एका कवितेच्या वाचनाने कायक्रमाची सांगता झाली.”








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा