शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ३१ ऑक्टोबर २०१५ ग्रंथ तुमच्या दारी - ग्रंथ पेटी कार्यक्रम वृतांत आणि छायाचित्रे

     महाराष्ट्र सेवा संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी सुविधा गोखले सभागृह (महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड) येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ अलका भावे यांनी केले. 
    या कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री विनायक रानडे , महाराष्ट्र सेवा संघाचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , प्रमुख अतिथी म्हणून श्री विसुभाऊ बापट आणि सौ उमा बापट उपस्थित होते.या शिवाय मुलुंड मधील ६ प्राथमिक शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक आणि विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरवात  ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची थोडक्यात माहिती देऊन करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना  मान्यवरांच्या हस्ते १०० पुस्तकांची  (७० मराठी आणि ३० इंग्रजी )ग्रंथ पेटी  प्रदान करण्यात आली. श्री विनायक रानडे यांना संवाद साधण्याची विनंती केली.
    श्री विनायक रानडे यांनी मुलांशी संवाद साधताना विचारले कि ती वाचतात का? तर त्याचे उत्तर अगदी एकासुरात हो असे आले मग ते म्हणाले कि वाचन हे आपली उन्नती घडवते त्यातून नवीन विषयाचे ज्ञान मिळते. वाचन सहभागातून शिक्षण घेणे शिकवते. त्यांनी त्याच बरोबर महाराष्ट्र सेवा संघाचे या  योजनेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.आणि श्री विसुभाऊ बापट यांनी या कार्यक्रमात येणे मान्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
      सौ युगंधरा वळसंगकर यांनी श्री विसुभाऊ बापट यांची थोडक्यात ओळख करून दिली. त्यांची ओळख करून देताना त्या सांगतात कि २६ मे १९८१ रोजी त्यांनी कुटुंब रंगलेय काव्यात या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर सलग ३४ वर्ष हा कार्यक्रम ते करत आहेत. त्यांनी २००७ मध्ये सलग १५ तास कविता वाचन करून नवीन विक्रम केला जो लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंदवण्यात आला. १ एप्रिल २०१५ रोजी वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि १२ जुन २०१५ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया असे सन्मान त्यांना मिळाले . विसुभाऊ नि मराठी रसिकांना मराठी कविता ऐकायची आणि अनुभवायची अनुभूती दिली.हा प्रयोग २७४२ वा आहे असे त्यांनी नमूद केले.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात याचे प्रयोग सादर करण्यात आले. आश्रम शाळांसाठी मोफत प्रयोग सदर केले. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या होऊ नये या साठी त्यांना कवितेच्या माध्यमातून धीर देणारे कार्यक्रम त्यांनी केले. हे सांगून  त्यांनी श्री विसुभाऊ बापट यांना   ओमकार काव्यदर्शन कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. 
     श्री  विसुभाऊ यांच्या कार्यक्रमाआधी आभारप्रदर्शन चा कार्यक्रम करण्यात आला . यात सौ गीता ग्रामोपाध्ये  आणि सौ प्रतिमा जोशी यांचा सत्कार मान्यवरान्तर्फे करण्यात आला. सौ अलका भावे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , श्री विनायक रानडे , श्री विसुभाऊ बापट , सौ उमा बापट , कॅन्टीन व्यवस्थापक , सेतू प्रकाशन चे श्री किशोर साळवी , श्री विजय वैद्य ,सौ मैत्रीये केळकर आणि उपस्थित प्रेक्षक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले त्यानंतर श्री विसुभाऊ यांनी कार्यक्रम सुरु केला.     
     श्री विसुभाऊ बापट यांनी त्यांचा ओमकार काव्य दर्शन हा कार्यक्रम सदर केला . कार्यक्रमाची सुरवात सरस्वती वंदनेने केली. त्यानंतर गुरु प्रार्थना केली. त्यानंतर विविध प्रकारच्या बाल कविता सदर करून मुलांना उत्तम प्रकारे गुंतवून ठेवले. कविता म्हणजे काय तिचे प्रकार हे फार सुंदर रित्या त्यांनी विशद केले. कविता म्हणजे उत्कट सौंदर्याचा भावपूर्ण अविष्कार हे सांगताना त्यांनी कवितेचे वेग वेगळे १२ प्रकार सांगितले . कविता सदर करताना त्यांना आलेले अनुभव आणि वेगवेगळ्या सुंदर कविता यांचे अप्रतिम सादरीकरण  त्यांनी या कार्यक्रमातून घडवले. श्री विसुभाऊ बापट यांनी सौ उमा बापट यांच्याविषयी माहिती देताना सांगितले कि त्या हिंदी विषयात विशारद असून त्यांनी ४ पुस्तके हि लिहिली आहेत, त्याशिवाय त्या बालभारती मध्ये गाईड चे काम करतात , कविता वाचनात हि त्या विसुभाऊ न साथ देतात.  
   सौ उमा बापट यांनी वाचन  हे माणूस घडवते. नुसते वाचन न करता त्यावर चर्चा केली तर नवीन विषयाचे आकलन हि होते. त्यांच्या लहान पाणी त्यांच्या वडिलांमुळे त्यांना वाचनाची आवड कशी निर्माण झाली . आणि शिस्तबद्ध वाचन केल्यामुळे त्यांचा कसा विकास झाला त्याचे त्यांनी वर्णन केले.
   या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मांडून ठेवलेल्या ग्रंथ पेटीचे मुलांना खूपच आकर्षण वाटत होते. श्री विसुभाऊ यांच्या कार्यक्रमात मुलांनी खूप सुंदर सहभाग दर्शवला.
    या कार्यक्रमाच्या संयोजनेत सौ मैत्रीयी केळकर, सौ अलका भावे , सौ प्रतिमा जोशी , सौ किशोरी वाणी , सौ युगंधरा वळसंगकर , सौ गीता ग्रामोपाध्ये , श्री विनायक जोगळेकर ,श्री विजय वैद्य आणि कुमारी अदिती भावे यांनी सहकार्य केले. नाशिक हून खास नाशिक ग्रंथ तुमच्या दरी विभागाचे श्री अरुण नातू हि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.      
                     
 

https://www.youtube.com/watch?v=q7q7wJGU48Q&feature=youtu.be

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा