गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

मी समन्वयक - मराठी भाषेच्या उत्कर्षाची चाहूल - श्री रामचंद्र पुरुषोत्तम मेहेंदळे

इवलेसे रोप लावलीयानावरी 
त्याचा वेलू गेला गगनावरी 
विनायकाच्या अंतरंगी स्वप्न होते आगळे 
स्वप्नपूर्तीचे समाधान असते जगावेगळे 

श्री विनायक रानडे , विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांनी मराठी भाषांचे संवर्धन व्हावे या एका ध्येयाने प्रेरित होऊन ग्रंथ तुमच्या दरी या बीज वृक्षाचा महावृक्ष कसा होईल याचा विचार तन मन धन लावून धरला आणि अखेर तो तडीस हि नेला. हा वटवृक्ष केवळ भारतापुरता मर्यादित न राहता परदेशस्थ मराठी नागरिकांपर्येंत पोहोचोवला यातच त्यांच्या यशाचे गमक आहे.
   सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांशी तुलना करता मराठी भाषेची किती शोचनीय अवस्था आहे हे सर्वजण  जाणतात  . महाराष्ट्राची मराठी भाषा हि जणू महाराष्ट्रामधून लुप्त होत चालली आहे असे आजचे एकंदरीत निराशाजनक चित्र आहे. मराठी भाषा जिवंत राहावी, तिचे संवर्धन व विकास व्हावा. लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व ती वृद्धिंगत व्हावी या एकमेव ध्येयाने श्री विनायक रानडे यांनी जी झेप घेतली आहे हि एक अभिनंदनीय व अविस्मरणीय अशी बाब आहे.
       या उपक्रमाला साहित्य क्षेत्रात , राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश जात आहे, उपक्रमाला प्रतिसाद मिळतो आहे. हेच या उपक्रमाचे फलित आणि यश आहे. मला पूर्ण विश्वास आहे कि आज ना उद्या   महाराष्ट्र सरकारला जाग येईल आणि मराठी भाषेला राजाश्रय प्राप्त होईल. या उपक्रमाद्वारे मराठी अस्मिता परत जागृत होऊन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल याबद्दल मनामध्ये तिळमात्र शंका नाही.
       मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी सर्व मराठी भाषिकांनी या उपक्रमाचे भव्य स्वागत करावयास हवे आणि जेथे जेथे शक्य आहे, जेथे जेथे मराठी माणूस आहे त्याच्या दारापर्येंत या उपक्रमाचे पाऊल पडावयास हवे . मराठी भाषेला भूतकाळात मिळालेले उज्वल यश भविष्यात परत प्राप्त करून देण्यास सर्व मराठी भाषिकांनी यथाशक्ती सहकार्य करावे हे आवाहन करतो

या उपक्रमासाठी माझ्या लाख लाख शुभेछा












        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा