बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

मी वाचक - विद्यार्थिनीचे मनोगत-प्रज्ञा विद्याधर सावंत (ज्ञानवर्धिनी विद्यालय)

ग्रंथ तुमच्या दारी या अतिशय सुंदर उक्तीचा अर्थ व महत्व हा उपक्रम राबवणाऱ्या लोकांना , आमच्या ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेला व शिक्षकांना पटले त्यामुळेच त्या सर्वांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी हा छानसा उपक्रम सुरु केला.
यंदा दहावीचे वर्ष असल्याने मला जास्त नाही पण थोड्या पुस्तकांचा आस्वाद घेता आला.उत्तम कांबळे यांचे "आई समजून घेताना" महाभारताच्या काळात नेणारे भाषासौन्दार्याने नटलेले "मृत्युंजय" कलेबद्दल उत्सुकता जागरूक करणारं आणि कलाकारांच्या (उत्कृष्ठ कलाकारांच्या )जीवनाची ओळख करून देणारे बाल गंधर्व यांच्या जीवनावर आधारित "गंधर्व गान"अशी काही पुस्तके वाचण्याचा योग प्राप्त झाला.
   मला आईचे प्रेम , माया , जिव्हाळा कळला कधी कधी मुलांवर चिडण्याचा रागावण्याचा तिचा त्यामागचा  हेतू       समजला.
  "कर्ण " हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी पूर्ण पणे अर्जुनाच्या बाजूने होते. कौरवांच्या अधर्माचा आणि सर्वच कौरवांचा राग यायचा . पण या लेखकांनी उत्कृष्ठ भाषा सौंदर्याचा वापर केला आहे. इतके सुंदर वर्णन केलं आहे कि माझ्या मनाला १००% पटले कि कर्ण चांगला होता. त्याच्यावर अन्याय झाला. ज्या कर्णाचा आधी राग यायचा , तो कर्ण पूर्णतः चुकीचा वाईट वागतो  अधर्म्यांना साथ देतो तोच कर्ण किती चांगला किती योग्य वागणारा होता असे वाटू लागले. वाचकांच्या मनाचा ठाव घेऊन त्याचे मतपरिवर्तन करून गोड कोमल मृदू शब्दात सुंदर भाषेच वापर करून आपले मत वाचकाला पटवून देणारे हे पुस्तक माझ्या दृष्टीने खूप चांगले वाटलं.
   वाचनाने माणूस चिंतनशील बनतो. या वाचनाचे महत्व सर्वाना कळावे याकरिता ग्रंथच आमच्यापाशी आले आहेत. त्याबद्दल हा उपक्रम राबवणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.


          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा